माथ्यावरच्या मातीच्या खापरातून
अवघ्या महाराष्ट्रभर ज्ञानाचा सूर्य वाटला,
तुकोबांचा अभंग गाताना,
विज्ञानाचा विचार पेरला.
हातातील दगडांच्या टाळातून
उडलेल्या ठिणग्यांमधून
विवेकाच्या मशाली पेटवल्या.
मळलेल्या मनाची वस्त्रे धुताना
समाजाच्या मेंदूतील
अंधश्रद्धेची जळमटे झाडली.
सगळ्यांचे जगणे लख्ख करीत,
आणि विचार स्वच्छ करीत
माणसाला माणूस व्हायला शिकवले.
बाबा,
तुकोबाला अपेक्षित धर्म
फक्त तुम्हालाच कळला,
आणि तुमच्यामुळेच आम्हाला...!
--- डॉ. महेश गायकवाड, सातारा
संत गाडगेबाबांना विनम्र अभिवादन🙏🙏
🙏🏻🙏🏻